सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली लोकलमध्ये जास्त गर्दी आणि लोकलमध्ये वेळेचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कल्याण स्थानकावरुन येणारी ट्रेन जेव्हा डोंबिवलीला येते तेव्हा महिला चा डबासुद्धा गर्दीने पूर्ण भरलेली असते. त्यामुळे डोंबिवलीकरांना ट्रेनमध्ये चढणं उतरण अशक्य होतं. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे मी वारंवार तक्रार केली. मात्र यावर अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंनी नियम ३७७ च्या अंतर्गत तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींनुसार हा मुद्दा उपस्थित करत लवकरात लवकर डोंबिवली स्थानकावरुन सुटणाऱ्या लोकलच्या फेऱ्या जास्तीत जास्त वाढविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा