'समृद्धी महामार्गासाठी शेतातील माती-मुरूम काढला जातो. ट्रक, डंपरच्या वाहतुकीमुळे गावोगावचे रस्ते पूर्ण खचून गेले आहेत. अद्याप रस्ता सुरू नाही तोच गावोगाव शेती गावठाण वेगळे पडले आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना वळसा घालून रस्ता ओलांडून शेतात जावे लागते. ठेकेदार ऐकत नाही. दादागिरी करून शेतकऱ्यांच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या जातात. रस्त्यासाठी बऱ्याच ठिकाणी खदानी खोदून त्यातून प्रमाणापेक्षा जास्त गौण खनिज काढले जाते. त्यामुळे गावोगाव या खदानी यमराज झाल्या आहेत. त्या धोकादायक खदानी बुजविल्या जाव्यात, तत्पूर्वी कुंपण करून त्या बंदिस्त तरी कराव्यात,' अशा तक्रारी बैठकीत करण्यात आल्या.
बैठकीत लक्ष्मीकांत शिंदे या शेतकऱ्याने थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपाला पुष्टी देणारे आरोप करीत जिल्ह्यात जमीन संपादनात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप केला. रस्त्यात नसलेली घरे रस्त्यात दाखविली गेली. मातीची घरे कॉंक्रिटची दाखविल्याचा आरोप करीत चौकशीसाठी उपोषणाचा इशारा दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी मांढरे यांनी समस्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देश देताना स्थानिक तक्रारीबाबत नियमित आढावा बैठका घेऊन पाठपुराव्याचे आश्वासन दिले.
समृद्धी महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाचे पैसे दिले हे ठीक आहे. पण या कामामुळे गावोगावचे रस्ते खराब झाले आहेत. धुळीमुळे पिकांचे नुकसान होते आहे. रस्त्यानंतर अनेक गावांतील नागरिकांना त्यांच्या शेतावर जाता येणार नाही. दळणवळण तुटेल. त्यामुळे रस्त्याखाली अंडरपास्ट करावेत, नियमित तक्रार निवारण बैठका घ्याव्यात, असे महत्त्वाचे निर्णय झाले. -अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा