श्रीनिवास पाटील पुढे म्हणाले, अथणी शुगर्स -रयत ने मागील गळीत हंगामातील गाळपास आलेल्या उसास एफआरपी २हजार ८६७ रुपये इतकी असताना २ हजार ९०० रुपये एक रक्कमी दर देत एफआरपी पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
चालू गळीत हंगामात एफआरपी तीन टप्यात देण्याचे शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी संभ्रमित अवस्थेत होता. मात्र, अथणी शुगर्स-रयत ने ऊस उत्पादक शेतकऱ्याची मागणी विचारात घेता एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबर मागील हंगामापासून प्रति टन सवलतीच्या दरात १ किलो साखर दिली जात आहे.
कारखान्याने २०२१-२२हंगामात ५ लाख मे. टन गळीताचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, योगेश पाटील यांची वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रयत कारखान्याचे संचालक अधिकारी सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्याकडून अभिनंदनाचा वर्षाव
अथणी रयत कारखान्याने एक रकमी एफआरपीची रक्कम जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी वर्गातून कारखान्याचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा