वीज बिल : सरासरी वीज बिल देण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश
मुंबई दि.15 महाराष्ट्रात सरासरी वीज बिल देण्याची अनेक वर्षांची पद्धत आहे, पण ही पद्धत बंद करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले. हा कोणाचा राजकीय विषय नाही. पण पद्धत बदलली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलांच्या मुद्दय़ावर सभागृहाचे लक्ष वेधले. वाढीव वीज बिले पाठवली जात आहेत. कोल्हापूरमधील पुरामध्ये घर वाहून गेलेल्या व्यक्तीला विजेचे बिल पाठवल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरासरी वीज बिलाची पद्धत बंद करण्याचे आदेश दिले.
सरासरी वीज बिल पाठवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा या सरकारने आणली नाही. हा कोणाचा राजकीय विषय नाही, पण ही पद्धत बदलली पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा