शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या गावात राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूका घेण्याबाबत चाचपणी

मुंबई ; दि.18 राज्यातील कोरोना सद्यस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या विचारार्थ आहे.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे , जेथे मतदान घेणे शक्य आहे , याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने दि.14 सप्टेंबर रोजी अहमदनगर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,नाशिक,जळगाव,नंदुरबार,पुणे,सातारा,कोल्हापूर,औरंगाबाद,नांदेड,अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलडाणा, नागपूर,वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून ग्रामपंचायत निवडणुका घेणे बाबतची माहिती मागविली आहे.

जिल्ह्यातील दि.31 मार्च 2020 रोजीचे मतदान तहकूब केलेल्या ग्रामपंचायतींपैकी कोणत्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील करोना परिस्थिती आटोक्यात आहे,जेथे मतदान घेणे शक्य आहे याबाबतचा विस्तृत अहवाल दि.21 सप्टेंबर 2020 पर्यंत आयोगास सादर करावा , जेणेकरुन आयोगाला निवडणूकीबाबत निर्णय घेणे शक्य होईल असे राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...