कराड (सातारा) : महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी गेलेले 44 जण इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे विमान रद्द झाल्यामुळे यात्रेकरू सध्या तेहरानमध्ये आहेत.
यात्रेकरूंपैकी एस एस मोमीन यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना संपर्क करून तेहरानमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती केली. त्याला प्रतिसाद देत खासदार पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
चीनमध्ये अडकलेल्या सातारच्या अश्वीनी पाटील यांच्यासह अन्य भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केल्याने केंद्र शासनाने स्वतंत्र विमान पाठवून कार्यवाही केली.
अडकलेल्या 44 जणांना भारतात- महाराष्ट्रात आणण्यासाठीची कार्यवाही सुरु करण्याची विनंती त्यांनी परराष्ट्र मंत्रायाला पत्राव्दारे केली आहे. त्यासाठी आणखी उद्या खासदार पाटील स्वतः परराष्ट्र मंत्रालयात जावुन त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत पुढाकार घेणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा